वृत्तसंस्था (पुणे सुपरफास्ट न्युज) -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐनवेळी दौऱ्यात बदल करून पाकिस्तानला भेट दिल्याबद्दल विविध राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. पंतप्रधानांनी खऱ्या मुत्सद्यासारखी कृती केली असून शेजाऱ्यांसोबतचे संबंध कसे असावेत हे दाखवून दिल्याचे परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे.
यापूर्वी मोदी यांनी शरीफ यांना वाढदिवसानिमित्त दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या होत्या.
मायदेशी परतताना लाहोरला काही वेळ थांबण्याचा मोदी यांचा निर्णय हा भारत व पाकिस्तानमधील ‘शिष्टाचारसंमत’ राजकारणापेक्षा वेगळ्या मार्गावर जाणारा असल्याचे सांगून भाजपने या भेटीचे स्वागत केले. या भेटीसाठी अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनापेक्षा अधिक योग्य दिवस असू शकत नव्हता, असेही पक्षाने म्हटले.
