दौंड ( पुणे सुपरफास्ट न्युज ) -    दौंड तालुक्याच्या  अ वर्षण प्रवण दुष्काळी भागासाठी शासनाने जानाई उपसा सिंचन योजना मंजूर करण्यात आली या योजनेतून भिजणार क्षेत्र ओलीता खाली आणण्यासाठी कालवा खोदाई कामे केली पण अद्याप कामे अपूर्ण आहेत .काल व्यातून शेतात पाणी सोडण्यात आलेले नाही.या योजनेसाठी कोठयावधी रूपये खर्ची टाकण्यात आले पण 10 टक्के क्षेत्र सुद्धा ओलीताखाली आलेले नाही.याभागाला वरदान ठरणारी ही योजना केव्हा पूर्ण होणार याकडे शेतकरी वर्गाचे लक्ष लागून राहिले आहे.ही जानाई  उपसा योजना युती शासनाने पूर्ण करावा अशी अपेक्षा बाळगून आहे. हिंगणीगाडा,पांढरेवाडी,कुरकूंभ परिसरातील उभी फिके पाण्याअभावी धोक्यात आली असून जारी पिक मुख्य अडचणीत आले आहे.शासनाने शिरसाई व जानाई उपसा सिंचन योजना दुष्काळी भागासाठी आखणी केली
.कुरकूभ पांढरेवाडी हिंगणीगाडा ही गावे जानाई योजनेत मोडतात या योजनावर राज्य शासनाने कोठयावधी रूपये खर्ची घातले पण या भागाला गेल्या पंधरा वर्षात पाणी आले नाही पैसा माण खर्ची पडला .ठेकेदाराचे उजळ पांढरे झाले.शेतक रया च्या तोंडाला पाने पुसली .अद्याप योजना आहे पण पाणी नाही पाट आहे पाणी नाही या स्थितीत आहे तेथेच आहे.निवडणुका  आल्या की आश्वासनाचे गाजर दाखवले जाते निवडणुका पार पडल्या की मागचे दिवस पुढे यांचा फटका सत्ताधारी ना बसला आहे. पुढच्याला ठेच मागचा शहाना या प्रमाणे आताच्या सत्ताधारपानी या  भागातील पिके वाचविण्यासाठी हालचाली कराव्यात अन्यथा येणारा काळ माफ करणार नाही. ( प्रतिनिधी - राजेन्द्र डी.भागवत )
 
Top